Plantation Day 2020

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून सभोवताली असलेले पर्यावरण प्रेम प्रकट झाले आहे. मित्रांनो पर्यावरण म्हणजेच सभोवताली असलेली नैसर्गिक सृष्टी , आपली जननी, अर्थातच वसुंधरा. नुकत्याच वाचनात आलेल्या, श्री. धीरज नवलखे यांच्या या चारोळी खूपच मनाला भिडल्या…. पूरे जाहले तूझे तापणे जरा उमाळा उमलू दे , नजर घनाला वर्षुन ह्रदयी तृणा तृणाला उमलू दे . खरोखरच पृथ्वीला विनंती करण्याची वेळ आली आहे, मनुष्य प्राणी च आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाच्या अस्तित्वाचा ठसा पुसत चालला आहे. आणि म्हणूनच असे वनसंवर्धन सप्ताह साजरे करावे लागत आहेत. परंतु ,आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष, आद. श्री. धनराज विसपूते व सचिव आद. श्रीम. संगिता विसपूते अनेक वर्षांपासून १जुलै रोजी आपल्या कन्येच्या जन्मदिना निमित्ताने आपल्या शैक्षणिक समूहातील सर्व विभागांद्वारे वृक्षारोपणाचे कार्य न चुकता करत आहेत. आजही या टाळेबंदी च्या काळातही शासन नियमांचे पालन करून या समूहातील सर्वच विभागांतर्फे, कुमारी धनश्री हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्यात आले. त्याची काही क्षणचित्रे.

न हरता , न थकता , न थांबता प्रयत्न करणार्यां समोर कधी कधी नशिब सुध्दा हरतं

” न हरता , न थकता , न थांबता प्रयत्न करणार्यां समोर कधी कधी नशिब सुध्दा हरतं “….
….पाणी वाहतं म्हणून त्याला मार्ग सापडतो , त्याच प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, समाधानाची वाट सापडतेच…
मागच्या ६ महिन्यांपासून कोरोना सारख्या जागतिक महामारीला संपूर्ण जग सामोरे जात आहे… आर्थिकदृष्ट्या, तंत्रज्ञानाने प्रगत अशा सुपर पाॅवर देशांना सुध्दा कोरोनामुळे नामोहरम व्हावे लागत आहे. भारतामध्ये गेल्या २ महिन्यांपासून कोरोना नामक भयनाट्य सुरू आहे….. त्याचा निर्माता कोण ? दोषी कोण? यापेक्षा, त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई कोणती यावर भारतामध्ये निर्णय घेण्यात आले. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील तरतुदीनुसार ‘संघराज्य ‘ हा शब्द राज्यघटनेत वापरला आहे. ‘ Nation first ‘ ही तरतूद संघराज्य मजबूत करते व संविधानिक शक्तीमुळे , शासनाकडून लोकहितासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घेतले गेले , हीच सगळ्यात जमेची बाजू आहे.
“अपयशाच्या भितीपेक्षा , यश मिळविण्याची इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे “….. याचा प्रत्यय आपल्या देशातील शासन निर्णयातून येतो.
‘ हो ‘ आणि ‘ नाही ‘ हे दोन छोटेसे शब्द आहेत. परंतु त्यावर सखोल विचार केला तर लक्षात येते की, ‘ नाही ‘ लवकर म्हटल्यामुळे तर ‘ हो ‘ उशीरा म्हटल्यामुळे, जीवनात बर्याच गोष्टी गमवाव्या लागतात.
आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष आद. श्री धनराज विसपुते आणि सचिव आद. श्रीमती संगीता विसपुते यांच्या सकारात्मक विचारसरणीमुळे आणि समयसुचकते मुळे आदर्श शैक्षणिक संकुल, हे कोणत्याही कठीण प्रसंगात ठामपणे उभे राहाते…. कोरोना सारख्या जागतिक संकटामध्ये सुध्दा , संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या विविध ५० शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून या उभयतांनी वेळोवेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत , आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ‘ Work From Home ‘ या संकल्पने नुसार , सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू ठेऊन, समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे…..
” आदर्श शिक्षक प्रशिक्षण केंद्र ” हे यापैकीच एक, संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक केंद्र संचालिका मार्फत समस्त जनतेला दिला गेलेला एक संदेश… एक जनजागृती….
” चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे संयम ठेवतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात , पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्र्वास ठेवतात “…
मित्रहो आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही.
सकारात्मक विचार करूया,
सहकार्य करूया ,
विजय मिळवूया,
कोरोनावर मात करूया.
प्राचार्या
श्रीमती जाई जगताप.
🙏🏻🙏🏻

Teacher’s development program series by Parisar Asha

Had a wonderful time conducting first session on Soft Skill under the teacher’s development program series by Parisar Asha for the Adarsha Group of Education, Panvel. Thank you Jai Anand Jagtap for giving us the opportunity. I am really impressed with the wonderful work you are doing by providing opportunities to your students to learn new trends and techniques in education. It’s really a great thought to introduce them to progressive teaching learning methods while they are perusing early childhood education.

Independence Day celebration 2019

We have celebrated 73rd Independence day at Adarsh Teacher’s Training Institute in presence of Hon. Dignitaries, Dr. Girish Gune sir… By the inspiration from Hon. Chairman sir, Shri. Dhanraj ji Vispute & Hon. Secretary Madam Smt. Sangeeta Vispute , all the Principals from various departments , along with teaching and non teaching staff with more than 1500 students have made arrangements and presented this successful Independence Day celebration on behalf of Adarsh Group of Education.